Ads

कर्जबाजारीपणामुळे शेतकऱ्याने मृत्यूला कवटाळले..!

चंद्रपूर :- चंद्रपूर जिल्ह्यातील शेणगाव येथे कर्जबाजारीपणाला कंटाळून एका शेतकऱ्याने आत्महत्या केली, ही घटना चंद्रपूर जिल्ह्यातील शेणगाव येथे 06 नोव्हेंबर रोजी सकाळी उघडकीस आली आहे.पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृताचा ताबा घेतला. मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठविला.
पहाटे ५ वाजण्याच्या सुमारास शेतकरी घरातून शेताकडे जाण्यासाठी निघाले असता त्यांनी शेतात असलेल्या विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, काही दिवसांपूर्वी त्यांच्या पत्नीचा आणि मुलाचा अपघात झाला होता आणि त्यांच्यावर बँकेचे कर्जही होते, त्यामुळे त्यांची आर्थिक स्थितीही बिकट झाली होती.

Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment