कोरपना :- राज्यातील शेतकऱ्यांची फसवणूक झाल्याचा आरोप करत प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी कर्जमाफीसाठी मशाल आंदोलन जाहीर केले आहे.
'Prahar' torch movement for farmers' loan waiver
कर्जमाफीच्या मुद्द्यावरून घुमजाव करणाऱ्या सरकारविरोधात रान पेटविण्याचा इशारा माजी आमदार तसेच प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी दिला आहे. या अंतर्गत पहिल्या टप्प्यात महात्मा फुले यांच्या जयंतीदिनी शुक्रवारी (ता. ११) रात्री १२ वाजता राज्यातील प्रत्येक आमदाराच्या घरासमोर मशाल आंदोलन केले जाणार आहे.विधानसभा निवडणुकीच्या पूर्वी महायुतीच्या नेत्यांनी शेतकऱ्यांचा सात-बारा कोरा करणार असल्याचे जाहीर केले होते. त्यामुळे शेतकऱ्यांनी महायुतीला भरभरून मतदान करीत सत्तेत बसविले. आता मात्र अर्थमंत्री अजित पवार यांनी येत्या तीन वर्षांत तरी कर्जमाफी शक्य नसल्याचे सांगत शेतकऱ्यांनी कर्ज भरण्याचे आवाहन केले. त्यामुळे राज्यभरातील शेतकऱ्यांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे. त्याचीच दखल घेत बच्चू कडू यांनी याविरोधात आंदोलनाचा बिगुल फुंकण्याचा इशारा दिला आहे.
याच उद्देशाने प्रहार जनशक्ती पक्ष चंद्रपूर प्रमुख सतीश बिडकर यांनी बच्चुभाऊ कडू यांना दुजोरा देत राजुरा विधानसभा क्षेत्राचे आमदार देवराव भोंगळे यांच्या घरासमोर शेतकरी कर्जमाफी, शेतमालाला हमीभाव मिळावा याकरिता मशाल आंदोलन आज ११ एप्रिल २०२५ ला करण्यात येणार आहे या आंदोलनात
चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व प्रहार जनशक्ती पक्षाचे पदाधिकारी तालुका अध्यक्ष, महिला प्रतिनिधी, शहर अध्यक्ष, जनप्रतिनिधी, शाखा अध्यक्ष, गट, गण प्रतिनिधी, शेतकरी प्रहार दिव्यंग संघटना तसेच सर्व कार्यकर्ते यांनी राजुरा येथे रात्री 8 वाजता पंचायत समिती जवळ यावे. दिनांक 11/04/2025 ला होणाऱ्या टेम्बा आंदोलनात जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे असे आव्हान जिल्हा अध्यक्ष बिडकर यांनी केले
अधिक माहिती साठी संपूर्ण 8975728233
0 comments:
Post a Comment