मोदी सरकार सत्तेत आल्यापासून हुकुमशाही पद्धतीने कारभार करीत आहे. विरोधकांना संपविण्यासाठी केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर करू लागले आहे. यातूनच काँग्रेसच्या अध्यक्ष सोनियाजी गांधी यांना सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) नोटीस बजावली आहे. या प्रकारामुळे देशभरातील काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये मोदी सरकारविरोधात संपात व्यक्त होत आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी कार्यालयाने याविरोधात आंदोलनाची घोषणा केली आहे. त्यानुसार चंद्रपूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या पुढाकारातून आंदोलन करण्यात आले. यावेळी काँग्रेस कार्यकर्त्यांनी मोदी सरकारविरोधात घोषणाबाजी केली. यावेळी चंद्रपूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटी, ग्रामीण काँग्रेस, महिला काँग्रेस, युवक काँग्रेस, एनएसयुआय, अनुसूचित जाती विभाग, ओबीसी विभाग, अल्पसंख्याक विभागासह अन्य विभाग व सेलचे अध्यक्ष, पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
केंद्र सरकारविरोधात शांततापूर्ण सत्याग्रह
चंद्रपूर : काँग्रेसच्या अध्यक्ष सोनियाजी गांधी यांना सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) चौकशीची नोटीस बजावली. त्यामुळे देशभरातील काँग्रेस कार्यकर्ते मोदी सरकारविरोधात आक्रमक झाले आहेत. प्रदेश कार्यालयाच्या निर्देशानुसार चंद्रपूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने मंगळवारी गांधी चौकात आंदोलन करण्यात आले होते. आज बुधवारी २७ जुलैला दुसऱ्या दिवशी चंद्रपूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष रितेश (रामू) तिवारी यांच्या नेतृत्वात कस्तुरबा चौकात शांततापूर्ण सत्याग्रह आंदोलन करण्यात आले.Peaceful Satyagraha against the Central Government
0 comments:
Post a Comment