तालुका प्रतिनिधी भद्रावती जावेद शेख:- राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भद्रावती तालुक्यातील पूरग्रस्त झालेल्या पिपरी गावाला भेट देऊन तेथील पुराने झालेल्या नुकसानीची पाहणी केली व पूरग्रस्तांशी संवाद साधला. यावेळी पिपरी, घोणाड व कोच्ची या गावकऱ्यांतर्फे अजित पवार यांना परिसरातील समस्यांचे निवेदन सादर करून या समस्या निवारण्याची मागणी केली.
गाव तथा परिसरातील समस्यांचा आपण शासन दरबारी पाठपुरावा करून न्याय देण्याचा प्रयत्न करू असे आश्वासन त्यांनी येथील गावकऱ्यांना दिले. पिपरी गावात आल्यानंतर ज्या ज्या भागात पुराने थैमान घातले त्या त्या भागाची त्यांनी पाहणी केली उकणी खाणीतील निघणाऱ्या मातीच्या भराव्यामुळे नदीचे पाणी थोपुन पिपरी गावात जेथून घुसले त्या नदीपात्राचीही त्यांनी पाहणी केली. याबरोबरच त्यांनी गाव तथा परिसरातील शेतकऱ्यांच्या शेतमालांच्या झालेल्या नुकसानीचा आढावा घेतला या दौऱ्यात अजित पवारांसोबत क्षेत्राचे खासदार बाळू धानोरकर व आमदार प्रतिभा धानोरकर यांची उपस्थिती होती. या दौऱ्या दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र वैद्यआमदार चन्द्रिकापुरे, सलिल देशमुख, माजी आमदार तोड़साम,, प्रदेश प्रतिनिधी मुनाज शेख, नितीन भटाळकर, तालुकाध्यक्ष सुधाकर रोहणनकर, विलास नेरकर, फैयाज शेख, सुनील महाले, रोहन कुटेमाटे,अमोल बडगे, पनवेल शेंडे,संतोष वास्मवार,रोशन बकोरेड्वार सबीया देवगडे, पुलिस पाटिल सुनीता थोंबरे,किरण साळवे तथा गावातील पदाधिकारी कार्यकर्ते व परिसरातील ग्रामस्थांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

0 comments:
Post a Comment