सावली: शासनाकडून दिलेल्या शालेय पोषण आहारामधुन पारडी येथील जिल्हापरिषद शाळेतील विद्यार्थ्यांना विषबाधा झाल्याची घटना गुरुवारी, ५ डिसेंबर ला घडली. यात साधारणत ८० विद्यार्थ्यांना विषबाधा झाली असुन आकडा वाढण्याची शक्यता वर्तविली जात आहे. सर्व विषबाधीत विद्यार्थ्यांना सावलीचे ग्रामिण रुग्णालय व मुल येथील उपजिल्हा रुग्णालयात भरती करण्यात आले आहे.
80 students suffer from food poisoning at Pardi Zilla Parishad School
तालुक्यातील पारडी येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेमध्ये १३३ पटसंख्या असुन घटनेच्या दिवशी १२६ विद्यार्थी हजर होते. ४ डिसेंबर ला शालेय पोषण आहारा मध्ये विद्यार्थ्यांना उखडलेला चणा, तिखट व मिठ लावून दिलेले होते. परंतु दिलेला पोषण आहार निकृष्ट दर्जाचा असल्याने विद्यार्थ्यांना रात्रोच्या वेळेस उलट्या, हगवण व ताप येणे सुरु झाले. परंतु व्हायरल फेवर मुळे ताप आलेला असेल या उद्देशाने पालकांनी पाहिजे त्या प्रमाणात लक्ष दिले नाही. ५ डिसेंबर ला विद्यार्थी शाळेत आले त्यावेळेसही विद्यार्थी उलटया करीत असल्याने काही विद्यार्थ्यांना सावलीचे ग्रामिण रुग्णालयात भरती करण्यात आले. लक्षणांवरून विषबाधा झाली असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. सावली येथे तात्काळ आरोग्यसेवा उपलब्ध करुन विद्यार्थ्यांवर उपचार करण्यात येत असले तरी या रुग्णालयात वैद्यकीय अधिकाऱ्यांची पदे रिक्त असल्याने उपचार करण्यास अडचण निर्माण झाले.
सदर पोषण आहार हा ऑक्टोंबर महिण्याच्या १७ तारखेला शाळेला प्राप्त झाल्याची माहिती आहे. दोन महिण्यापुर्वीचा पोषण आहार असल्याने विद्यार्थ्यांना उलटया, हगवण व ताप आल्याची प्राथमिक आहे. त्यामुळे यात दोषी आढळण्याऱ्यावर कारवाई करण्याची मागणी पालकांकडून केल्या जात आहे. दरम्यान विवेक जॉनसन मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी ग्रामीण रुग्णालयात भेट दिली.
विषबाधा प्रकरणात सखोल चौकशी करावी - आ. श्री. सुधीर मुनगंटीवार
विषबाधा झालेल्या विद्यार्थ्यांना तातडीने वैद्यकीय सुविधा द्या*
चंद्रपूर - विद्यार्थ्यांच्या विषबाधा प्रकरणातील सखोल चौकशी करण्याचे स्पष्ट निर्देश मा. आ. सुधीर मुनगंटीवार यांनी प्रशासनाला दिले आहेत. सावली तालुक्यातील पारडी येथील जिल्हा परिषद शाळेत खिचडीतून विषबाधा झालेल्या विद्यार्थ्यांना तातडीने वैद्यकीय उपचार उपलब्ध करून द्यावे, अशाही सूचना आ. मुनगंटीवार यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.
सावली तालुक्यातील पारडी येथील जिल्हा परीषद शाळेत विद्यार्थ्यांना खिचडीतून विषबाधा झाली. या शाळेत एकूण 126 विद्यार्थ्यांना खिचडी देण्यात आली. या विद्यार्थ्यांनी खिचडी खाल्ल्यानंतर त्यातील 106 विद्यार्थ्यांची प्रकृती बिघडली त्यामुळे विद्यार्थ्यांना उपचारासाठी रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. या सर्व विद्यार्थ्यांना खिचडीतून विषबाधा झाल्याची माहिती मिळत आहे.
या संपुर्ण प्रकरणाची निःपक्ष चौकशी करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना आ. मुनगंटीवार यांनी दिले आहेत. रुग्णालयात भरती विद्यार्थांना उत्तम उपचार मिळावे, यासाठी जिल्हा प्रशासनातील अधिकाऱ्यांनी स्वतः लक्ष द्यावे, असे निर्देशही आ मुनगंटीवार यांनी दिले आहेत.
0 comments:
Post a Comment