Ads

शासकीय योजनेतून समाजातील शेवटच्या घटकाचा विकास साधा.

चंद्रपूर :
केंद्र व राज्य शासन समाजातील शेवटच्या घटकाचा विकास करण्यासाठी, नागरिकांची आर्थिक उन्नती साधण्यासाठी विविध कल्याणकारी योजना राबविते. या योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीतून समाजातील आर्थिक दारिद्र्य दूर करता येते. तरी कार्यान्वयीन यंत्रणांनी योजनांच्या अंमलबजावणीतून समाजातील शेवटच्या घटकाचा विकास साधावा, अशा सूचना आमदार प्रतिभाताई धानोरकर यांनी दिल्या. त्या वरोरा पंचायत समिती येथील आमसभेत बोलत होत्या. यावेळी त्यांनी २० विभागाचा आढावा घेतला. 
यावेळी गटविकास अधिकारी राठोड, सभापती धोपटे, उपसभापती भोयर, बाजार समिती सभापती राजू चिकटे, माजी सरपंच मिलींद भोयर, श्री पावडे यांच्यासह सरपंच, उपसरपंच व ग्रामपंचायत सचिव उपस्थिती होते. 

यावेळी आमदार प्रतिभाताई धानोरकर आढावा घेताना अधिकाऱ्यांना अनेक विषयावर सूचना केल्या. त्यामध्ये सद्य शेतात पीक उभे आहे. त्याकरिता पाणी देण्याकरिता दिवस वीज पुरवठा देणे गरजेचे आहे. त्यासाठी पाठपुरावा करून दिवसा वीजपुरवठा देण्याच्या सूचना त्यांनी केल्या. त्यासोबतच ग्रामीण भागातील जनतेला हक्काचे घर मिळावे. त्याकरिता कागद पात्रांची कमी असल्याने अधिकारी त्यांना योजनांपासून वंचित ठेवत असल्याच्या तक्रारी असतात. त्याकरिता त्यांनी अधिकाऱ्यांना सर्व लाभार्थ्यांना हक्काचे व लवकर घरकुल योजनांचा लाभ देण्याचे त्यांनी सांगितले. यासह अन्य विषयावर देखील यावेळी आमदार प्रतिभाताई धानोरकर यांनी चर्चा करीत अधिकाऱ्यांना सूचना केल्या. त्यासह ग्रामीण भागाचा विकासासाठी कोणतीही योजना असो त्यापासून ग्रामीण भागातील जनता वंचित राहता कामा नये यासाठी अधिकाऱ्यांनी स्वतः लक्ष घालण्याचे त्यांनी सांगितले.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment