सादिक थैम वरोरा:तालुक्यात शेगाव १३ सदस्यीय मोठी ग्रामपंचायत असून याठिकाणी विकासात्मक दृष्टीकोन ठेऊन विकास साधला जात नसून अनेक समस्यांनी ग्रामस्थ त्रस्त आहे.त्यामुळे ग्रामस्थांनी ग्रामपंचायत कार्यालयाला २९ मे २०२५ ला कुलूप ठोकले.

वरोरा पंचायत समिती अंतर्गत शेगाव ग्रामपंचायती मार्फत दोन वर्षापासून नागरिकांना नळ कनेक्शन देण्याचे काम सुरू आहे. ज्यांना नळ कनेक्शन देण्यात आले .परंतु अजूनपर्यंत नळाला पाणी पोहचले नाही.जवळपास १००० ते १५०० नागरिकांना नळ कनेक्शन देण्याचे काम बाकी आहे.परंतु ग्रामपंचायत प्रशासन म्हणतात की शासनाने या कामासाठी निधी दिला होता.परंतु निधी संपला असून यानंतर नागरिकांना नळ कनेक्शन घ्यायचे असेल तर पैसा भरावे लागतील अशी तंबी प्रशासनाने नागरिकांना दिली आहे असा आरोप सुद्धा नागरिकांनी केली आहे.
गावामध्ये पूर्णतः गंधगी पसरलेली आहे. नाल्या साफ न केल्याने सांडपाणी व्यवस्थित वाहून न जात असल्यामुळे रस्त्यांवर पाणी साचलेले,ठिकठिकाणी कचऱ्याचे ढिगारे ,तसेच नळ कनेक्शन साठी खोदकाम करून पाईप टाकण्यात आले.परंतु ते बुजविण्यात आले नसल्याने सर्व माती रस्त्यांवर आली.त्यामुळे सर्वत्र चिखल निर्माण झाला आहे.रहदारी करण्यास नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
आठवडी बाजार मध्ये गट्टू लावण्यासाठी १० लाख निधी मंजूर झाला.आणि ते काम एका ठेकेदाराला देण्यात आले.परंतु दहा लाखातून दोन लाखाचेही काम झाले नाही. ग्रामपंचायत अंतर्गत विकासकामात गैरप्रकार झाला असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.गावचा विकास पूर्णतः खुंटला आहे.वरिष्ठ प्रशासनाने ग्रामपंचायतच्या कारभाराची सखोल चौकशी करून दोषिवर कारवाई करूनआम्हा नागरिकांना न्याय द्यावा अशी मागणी सचिन झाडे,नितीन कोटकर , लता सहारे,वैशाली बरडे , मंगेश शेडामे, छाया साखरकर ग्रामवसियानी केली आहे.
पोलिसांच्या हस्तक्षेपामुळे ग्रामपंचायत कार्यालयाचे कुलूप उघडले
शेगाव ग्रामपंचायत प्रशासनाच्या अकर्यक्षमतेमुळे व गाव विकास खुंटल्यामुळे , सोबतच भेडसावणाऱ्या समस्या घेऊन ग्रामस्थ संतप्त झाले.त्यामुळे ग्रामपंचायत कार्यालयाला महिला व पुरुषांनी कुलूप ठोकले.काही ग्रामस्थ पोलीस स्टेशन ला पोहचले.आणि त्यांचेसमोर समस्या मांडल्या.पोलिसांनी कायद्याचा आधार घेऊन त्यांची समजूत घातली आणि ग्रामस्थांना कुलूप उघडण्यासाठी सूचना दिल्या. तदनंतर ग्रामस्थांनी कुलूप उघडले .
0 comments:
Post a Comment