राजुरा :-गोवरी सेंट्रल कोळसा प्रकल्प मागील पाच महिन्यापासून रखडला असून त्या मागे चालू झालेला गोवरी पोवणी अंमलगन प्रकल्प सेकशन 9 वर पोहचला आहे.
शिवसेना नेते माजी जिल्हाप्रमुख बबन भाऊ उरकुडे यांच्या नेतृत्वात काही महिन्यापूर्वी करण्यात आलेल्या सायंडींग बंद आंदोलनात तत्कालीन मुख्य महाप्रबंधक डे साहेब यांनी 2026 प्रयन्त प्रकल्प पूर्णतःवस नेण्याचे आश्वासन दिले होते परंतु मागील 5 महिन्यापासून हा प्रकल्प सेकशन 4 च्या समोर गेला नाही, त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये असंतोष पसरला आहे. यासंबंधि आज पुनः शिवसेना नेते माजि उपजिल्हा प्रमुख राजुरा , महामंत्री एच एम एस यूनियन बल्लारपूर एरिया श्री बबनभाऊ उरकुडे यांच्या नेतृत्वात गोवरी सेंट्रल कोयला प्रकल्प संघर्ष समिती यांनी बल्लारपूर मुख्य महाप्रबंधक यांना निवेदन देऊन 7 दिवसाचा अल्टीमेटेम देत सेकशन 7 लागू करण्याची अट घातली .
अन्यथा सात दिवसानंतर एच एम एस यूनियन बल्लारपूर एरिया सह प्रकल्प संघर्ष समिती काम बंद आंदोलन फुकरणार असल्याची माहित देण्यात आली. त्या वेळेस श्री शंकर भाऊ पारखी ,उईके सर,गोयेगाव उपसरपंच स्नेहल पडवेकर,मारोती चनने,अखिल लोनगाडगे,धनंजय सातपुते,साईनाथ लांबट,सूरज गाडवे,अजय गौरकर,शिशिर लांडे साहिल राखूंडे,मिलिंद लोहे व समस्त गोवरी सेंट्रल प्रकल्प ग्रस्त शेतकरी उपस्थित होते
0 comments:
Post a Comment