चिमूर, दि. ७ जुलै :
चिमूर तालुक्यातील बरंडघाट वनपरिक्षेत्रात सोमवारी सकाळी वाघाच्या हल्ल्यात राजेंद्र तिमाजी भोयर (वय ५०) या शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. शेतातील कामासाठी जंगलालगत गेले असताना दबा धरून बसलेल्या वाघाने त्यांच्यावर अचानक झडप घातली. हल्ला इतका भीषण होता की त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. Tiger attacks again in Chimur's Barandghat! Farmer killed on the spot; 23rd victim of human-wildlife conflict
घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थ, वनविभागाचे अधिकारी आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा करून पुढील कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. या घटनेमुळे बरंडघाट व परिसरातील गावांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून शेतकरी आणि नागरिकांमध्ये दहशत पसरली आहे.
संतप्त ग्रामस्थांनी वाघाचा तातडीने बंदोबस्त करावा, जंगलालगत गस्त वाढवावी तसेच मृत शेतकऱ्याच्या कुटुंबीयांना तातडीची आर्थिक मदत आणि शासकीय नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी केली आहे.
0 comments:
Post a Comment