Ads

अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना आर्थिक मदत जाहीर करा

चंद्रपुर :-
धानाचे पीक कापणीला आलेले असताना व काही पीक मोठया प्रमाणावर कापून झालेले असताना ऐन वेळेवर अवकाळी पाऊस आल्याने जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे त्यामुळे तातडीने अशा नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांच्या पिकांचे पंचनामे करून नुकसान ग्रस्त शेतकऱ्याना लवकरात लवकर आर्थिक मदत जाहीर करावी अशी मागणी ग्रा प सदस्य राकेश गोलेपल्लीवार यांनी
चंद्रपुर जिल्ह्यातील सावली तालुका हा मोठा धान पिक घेणारा क्षेत्र असुन शेतकऱ्यांनी धानाच्या पिकाची कापणी केली असून जमा करण्याचे काम सुरू होते. तसेच मोठ्या प्रमाणात धान कापणीचे कामही सुरू होते. माञ अचानकपणे मागील २-३ दिवसांपासून सातत्याने अवकाळी पाऊस सुरू असून कापलेले धानाचे पीक पाण्यात सापडले त्यामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झालेले आहे .शासनाने अशा नुकसानग्रस्त पिकांचे तातडीने पंचनामे करून नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत जाहीर करावी अशी मागणी ग्रा प सदस्य राकेश गोलपल्लीवार यांनी केली.*
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment