Ads

धान उत्पादकांना सरकारने वाऱ्यावर सोडले

Government releases paddy growers
मुंबई : विदर्भातील धान उत्पादन शेतकऱ्यांना महाविकास आघाडी सरकारने वाऱ्यावर सोडल्याची टीका विधिमंडळ लोकलेखा समितीचे अध्यक्ष आ. सुधीर मुनगंटीवार यांनी केली. शासकीय विधेयकावरील चर्चेत धान उत्पादकांच्या प्रश्नांबाबत विधानसभेत झालेल्या ते बोलत होते.

भाजपचे सरकार महाराष्ट्रात असताना सरकार धान उत्पादकांच्या पाठीशी उभी होती. परंतु त्यानंतर सरकारने धान उत्पादक शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले. धानाला बोनसच दिला नाही. विदर्भावर सातत्याने अन्याय होत आहे. आता सरकार धान उत्पादक शेतकऱ्यांवरही अन्याय होत आहे. त्यामुळे धान उत्पादक शेतकरी मोठ्या अडचणीत सापडला आहे. सरकारने धान उत्पादक शेतकऱ्यांकडे लक्ष न दिल्यास ते महाविकास आघाडी सरकारची तीनही चाके पंक्चर केल्याशिवाय राहणार नाही, असा ईशारा आ. मुनगंटीवार यांनी दिला.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment