Ads

मध्यमवर्गीय व नौकरदारांची घोर निराशा करणारा अर्थसंकल्प डॉ. अशोक जीवतोडे

चंद्रपुर :-पुढील आर्थिक वर्षांच्या अर्थसंकल्पातून कर रचनेत कोणताही बदल न केल्यामुळे मध्यमवर्गीयांची व नौकरदारांची घोर निराशा झाली आहे. तसेच या अर्थसंकल्पातुन पाहिजे तसा रोजगार निर्मितीवर भर न दिल्यामुळे रोजगार निर्माती मोठ्या प्रमाणात होऊ शकत नाही. अनेक वस्तु स्वस्त व अनेक वस्तु महाग केल्यामुळे केंद्र सरकारचे उत्पन्नच वाढविण्याचे या अर्थसंकल्पातुन भर दिला आहे पायाभूत सुविधेसाठी मात्र चांगली तरतूद केली आहे. रस्ते हवाई वाहतुकीसाठी व ई व्हेइकल साठी चांगली गुंतवणूक आवश्यक आहे ती सुद्धा तुटपुंजीच वाटते. अल्प व मध्यम घटकाच्या साठी चांगली केली आहे. तसेच सर्वसामान्य शेतकन्यांना न्याय देण्याचा प्रयत्न दिसून येतो. हा अर्थसंकल्प दिर्घकालीन दूरदृष्टी व भविष्यकालीन अपेक्षा लक्षात न घेता तात्पुरता असल्याचे दिसून येते. मध्यमवर्गीय समाजावर भार पडेल तसेच महागाई वाढतीच राहील असेच काहीसे चित्र या अर्थसंकल्पातून दिसून येत आहे.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment