घाटंजी (तालुका प्रतिनिधी):-
घाटंजी नगर परिषद क्षेत्रात वाढीव १२ आंगणवाड़ी ची मागणी मुख्यमंत्री शिंदे यांच्या तर कड़े हिवाळी अधिवेशन मध्ये जावुन् घाटंजी महिला आघाडीच्या अध्यक्ष रीना धनरे यांनी केली आहे तसेच राज्याच्या महिला बाल कल्याण मंत्री अदिती तटकरे यांच्या कड़े वाढीव अंगणवाडी चे निवेदन सादर केले
घाटंजी नगर परिषद क्षेत्रात १७ वार्ड असून सध्या ६ अंगणवाडी सुरु आहे
अजुन १२ वार्डात अंगणवाडी ची आवश्यकता आहे त्या भागातील मुले पूर्व प्राथमिक शिक्षण, त्यांना मिळणाऱ्या आरोग्य सुविधा, त्यांना मिळणारे पोषण आहार पासून वचिंत राहत असल्याने या भागातील कुपोषण असलेल्या बालक असल्यास त्यांना सुद्धा आरोग्य व् आहार सुविधा मिळत नाही
या अंगणवाडी नसलेल्या भागात गरोदर माता सुद्धा पोषण आहार पासून वंचित राहत आहे
सदर राहिलेल्या भागात अंगणवाडी होणे आवश्यक असल्याची मागणी त्यांनी केली आहे महिला व् बालविकास मंत्री अदिति तटकरे यांनी त्वरित दखल घेण्याचे आश्वासन दिले आहे
0 comments:
Post a Comment