घाटंजी तालुका प्रतिनिधी :-येथील श्री समर्थ प्राथमिक शाळेत शाळेच्या पहिल्या दिवसानिमित्त सर्व विद्यार्थ्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. या स्वागताने चिमुकले हरखून गेले होते.
उन्हाळ्याच्या सुट्टीनंतर पहिल्या दिवशी शाळेत जाण्याचा आनंद मुलांच्या चेहऱ्यावर झळकत होता. शाळेत येताच, मित्रांच्या भेटी गाठी झाल्याने चिमुकले आनंदून गेले होते. शिक्षकांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन केलेले स्वागत आणि सोबतच मिळालेली नवी कोरी पुस्तके, यामुळे चिमुकल्यांच्या उत्साहात भर पडली. शिक्षणाप्रती त्यांच्यात ओढ निर्माण झाली. मुख्याध्यापिका विमल कांबळे, अंजली बोमीडवार, नीळकंठ परचाके, निखिल पवार, नेहा पाटील आदी शिक्षकांनी विद्यार्थ्यांचे स्वागत केले.
0 comments:
Post a Comment