नागपूर प्रतिनिधी :- मागील अनेक वर्षांपासून महाराष्ट्रातील आरोग्य विभागात कंत्राटी पद्धतीने काम करीत असलेल्या कर्मचाऱ्यांना शासनाने, लोकप्रतिनिधी,मंत्री आणि अधिकारी यांनी नियमितपणे समायोजन करण्यात येणार असल्याचे आश्वासन दिले होते. मात्र कित्येक वर्षे होऊनही महाराष्ट्रातील शासनाने काही केले नाही. अशातच आरोग्य विभागात कंत्राटी पद्धतीने काम करीत असलेल्या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी समायोजन करण्यात येणार असल्याचे आश्वासन देऊन लाखो रुपये वसूल करण्यात बादशाही यश मिळविले आहे. त्यात गडचिरोली जिल्ह्यातील काही संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची नावे प्रसिद्धी माध्यमाकडे आली आहेत. महाराष्ट्रातील राज्य सरकारने या संदर्भात गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे. यात उमेदवारांची फसवणूक केली आहे आणि जमा करण्यात येणारा पैसा नागपूर येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिले असल्याचे सांगितले जात आहे. हा चर्चेचा विषय ठरला आहे.
Lakhs of rupees were Demaned for adjustment in Gadchiroli district.
ग्रामीण ते शहरी भागात आरोग्य केंद्रे आणि उपकेंद्रे स्थापन करण्यात आली आहेत. या ठिकाणी आरोग्य कर्मचारी विविध पदांवर कार्यरत आहेत. मात्र,१० ते १५ वर्षे सेवा बजावूनही या कंत्राटी कामगारांना शासकीय लाभ आणि नोकरीच्या सुरक्षिततेपासून वंचित ठेवण्यात आल्याने त्यांच्यात असंतोष पसरला आहे. त्यातच आरोग्य विभागात कायमस्वरूपी पदे मिळवण्यासाठी त्यांच्याकडून प्रति व्यक्ती ७५,००० ते एक लाख रुपये उकळल्याचा आरोप काही आरोग्य कर्मचाऱ्यांनी नाव न छापण्याच्या अटीवर केला आहे.
दहा वर्षांहून अधिक काळ काम केलेले आहे त्यांनाच कायमस्वरूपी केले जाईल असा आदेश सरकारने जारी करण्यापूर्वी ही रक्कम गोळा करण्यात आली होती असे काही कर्मचाऱ्यांनी सावधगिरी बाळगत दबक्या आवाजात सांगितले. वर्षभरापासून रक्कम भरूनही अनेक कर्मचाऱ्यांना अद्यापही नियमित करण्यात आलेले नाही, त्यामुळे ते हताश आणि चिंतेत आहेत.
सैनिक समाज पार्टीचे जिल्हाध्यक्ष चक्रधर मेश्राम यांनी केलेल्या आरोपांनुसार गडचिरोली, भंडारा जिल्ह्यासह राज्यातील अनेक जिल्ह्यातुन हजारोंहून अधिक कंत्राटी कामगारांकडून कोट्यवधी रुपये वसूल करण्यात आले आहेत. धक्कादायक म्हणजे, काही आरोग्य कर्मचाऱ्यांनी ही रक्कम देण्यासाठी खाजगी सावकारांकडून उच्च व्याजदराने पैसे घेतले. काहींनी आपल्या ईपीएफ फंडातून पैसे काढून दिले आहेत आता, ते कर्जाची परतफेड आणि घर परिवार खर्चाचे व्यवस्थापन कसे करायचे यांच्यात अडकले आहेत, मंत्री आणि सचिवांसह वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या नावाने ही रक्कम वसूल करण्यात आल्याचा आरोप कर्मचाऱ्यांनी केला आहे. भ्रष्ट, फसवे सरकार भ्रष्टाचारमुक्त प्रशासनाचे स्वप्न दाखवत असतानाच हा कोट्यवधी रुपयांचा घोटाळा उघडकीस आला आहे. या घोटाळ्यामुळे संतापाची लाट उसळली असून, दोषींवर कठोर कारवाईची मागणी करण्यात आली आहे.
एनआरएचएम अंतर्गत कंत्राटी आरोग्य कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी करण्यासाठी महाराष्ट्रातील संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी , मंत्र्यांना देण्याच्या नावावर कंत्राटी कर्मचाऱ्यांकडून प्रत्येकी ७५ हजार रुपये प्रमाणे वसूल करुन कोट्यवधी रुपयांची अधिक माया जमविली. या भ्रष्टाचार प्रकरणात सरकारने लक्ष घालून सर्व कंत्राटी कर्मचाऱ्यांचा गोपनीय जबाब नोंदवून संबधित संघटनेच्या पदाधिकऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी सैनिक समाज पार्टीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष ॲड शिवाजी डमाळे, विदर्भ प्रमुख चक्रधर मेश्राम यांनी केली आहे.
0 comments:
Post a Comment