चंद्रपूर :-चंद्रपूर नागपूर महामार्गावर असलेल्या हायटेक फॉर्मसी महाविद्यालयाजवळ नेमक्या धुलीवंदनाच्या दिवशी एस टी बस व अनधिकृतपणे रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या चढ्ढा ट्रान्सपोर्टचा ट्रक ह्यांत भीषण धडक झाल्याने बस वाहक जागीच ठार झाल्याची धक्कादायक घटना घडली.
ST bus hits truck parked illegally on roadside; driver killed
शहरालगत असलेल्या पडोली येथील मुख्य चौकात मालवाहू ट्रक उभे असल्याने अपघाताला ते कारणीभूत ठरत आहेत. चंद्रपूर-नागपूर या मुख्य महामार्गावरच हे ट्रक उभे केले जात असल्याने रोज या चौकात अपघात होत आहेत. एसटी महामंडळाची एक बस अशाच एका ट्रकला रात्री धडकल्याने बसचा वाहक जागीच ठार झाला, तर 13 प्रवासी गंभीर जखमी झाले. या अपघातामुळे पुन्हा एकदा या मार्गावरील हा गंभीर प्रश्न समोर आलाय.
मध्यरात्री अपघात झाला अशी माहिती पोलीस व राज्य परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांना प्राप्त झाली, त्यांनतर घटनास्थळी पोलीस व राज्य परिवहन विभागाचे अधिकारी दाखल झाले, प्रवाशांना पोलीस नागरिकांच्या मदतीने बसमधून बाहेर काढत रुग्णवाहिकेत बसवीत होते. बसचे चालक दत्तात्रय इंगोले यांना नागरिकांनी बाहेर काढले. बसचे वाहक संदीप वनकर ट्रक व बसच्या सीट्मध्ये फसून गेले होते. त्यांच्या मागे बसलेले एसटी महामंडळाचे कर्मचारी सिद्धार्थ मडामे या दोघांना बसचा पत्रा कापून बाहेर काढत होते.
वाहक संदीप वनकर यांना रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. यासह एकूण १० ते १३ जखमी झाल्याची माहिती आहे.Chandrapur bus accident today
विशेष म्हणजे याच चौकात पोलिस ठाणे आहे.पण ट्रान्सपोर्ट मालकांशी स्नेहाचे संबंध असल्याने या ट्रकवर कारवाई केली जात नाही. रात्रीच्या अपघातानंतर आज सकाळी स्थानिक नागरिकांनी ट्रकचालकांना आपल्या भाषेत समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. पण वेळीच ठाणेदार पोहोचल्याने पुढील वाद मिटला. दोन दिवसांपूर्वी याच चौकात राख भरलेला ट्रक उलटला. त्यामुळे चौकात सर्वत्र राख पसरली आहे. त्यावरुन वाहने गेली की राख उडते आणि धुके पडल्यासारखे चित्र निर्माण होते. या धुळीने समोरचे वाहनही दिसत नाही. अजूनही ही राख उचलण्यात आलेली नाही. चौकातील दुकानदार, स्थानिक नागरिकांना याच त्रास सहन करावा लागत आहे.
रस्ता व्यापून उभ्या असलेल्या मालवाहू ट्रकचा प्रश्न निकाली काढला गेला नाही तर, अपघातांची मालिका अशीच सुरु राहील. दरम्यान, एसटी कामगारांनी आज बसस्थानकात आंदोलन करीत मृत वाहक संदीप वनकर याच्या कुटुंबाला 50 लाखांची मदत द्यावी अशी मागणी केली आहे. अन्यथा एकही बस आगारातून सुटणार नाही, असा इशारा संघटनेने दिला.
संदीप वनकर या वाहकाच्या मृत्यूनंतर आज सकाळपासून चंद्रपूर एसटी आगारात वाहक चालक व कर्मचाऱ्यांनी बंद पुकारला आहे. मृत वाहकाला 50 लाखांची नुकसान भरपाई द्यावी व राखेच्या टँकरच्या कंपनी विरोधात विरोधात गुन्हा दाखल करावा, अशी या संपकरी एसटी कर्मचाऱ्यांची मागणी आहे. जोवर या दोन्ही मागण्या पूर्ण होत नाही तोवर चंद्रपूर आगारातून कुठलीही एसटी बाहेर न पडू देण्याचा इशारा संपकऱ्यांनी केला आहे.
0 comments:
Post a Comment