सादिक थैम वरोरा : बुध्दगया येथिल महाबोधी महाविहार बौध्दांच्या ताब्यात देण्या च्या मागणी करिता आज बुधवार दि.२ एप्रिल रोजी वरोरा येथे दुपारी १२:३० वाजताच्या सुमारास डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक ते तहसील कार्यालय असा भव्य शांती मार्च काढण्यात आला. भन्ते महाथेरो ज्ञानज्योती, डॉ. चेत्ती भन्तेजी आणि भिक्कू संघ, संघरामगिरी पुज्य भदन्त धम्मासारथी आणि भिक्कू संघ, बुध्दीष्ठ सेमिनारी उंटखाना, नागपूर यांचे नेतृत्वात हा मार्च निघाला.
अखिल विश्वाच्या बौध्दांचे श्रध्दास्थान असलेले बुध्दगया येथील महाबोधी महाविहार विश्वात प्रसिध्द आहे. तथागत भगवान बुध्दाला याच ठिकाणी बुध्दत्य प्राप्त झाले. ज्या बोधीवृक्षाखाली बसून भगवान बुध्दाने ज्ञान प्राप्त केले तो पवित्र बोधीवृक्ष आजही त्या ठिकाणी अस्थित्वात आहे. या जागेचे महत्य व पावित्र्य लक्षात घेऊन सम्राट अशोकाने या ठिकाणी भव्य महाविहाराची निर्मिती केली. कालांतराने प्रतिक्रांतीच्या विळख्यात महाबोधी महाविहाराची दुरावस्था झाली. पुढे अनेक वर्ष हा महाविहार विलुप्त अवस्थेत होता. श्रीलंकेत जन्मलेले महान बौध्द तत्वज्ञानी अनागारीक धम्मपाल यांच्या अथक परिश्रमाने बुध्दगयेच्या महाबोधी विहाराचे पुनश्च संवर्धन करण्यात आले. तेव्हापासून या महाबोधी महाविहाराला भेट व तथागत भगवान बुब्दांना अभिवादन करण्यासाठी संपुर्ण विश्वातून बौध्द अनुयायी बुध्दगया येथे येत असतात. या ठिकाणी विश्वातील बौध्द राष्ट्रांनी बौध्दगया येथे आपआपल्या विहारांची निर्मिती केली आहे. आणि त्यामुळे बिहार राज्यांना फार मोठे महत्व प्राप्त झाले आहे.
बिहार विधानसभेने १९४९ साली बुध्दगया टेम्पल ॲक्ट १९४९ नुसार नऊ लोकांच्या समिती विहाराची देखरेख करण्यासाठी नियुक्त केली होती. त्यावेळेस भारतामध्ये बौध्दांची संख्या कमी असल्यामुळे हे नऊही लोक हे हिंदु धर्मियच असायचे. परंतू १४ ऑक्टोंबर १९५६ला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी नागपूरच्या दिक्षाभुमीवर लाखो लोकांना बुध्दधम्माची दिक्षा दिल्यामुळे आज महाराष्ट्रात बौध्दांची संख्या साधारणतः एक कोटी आहे. तसेच १९५६ नंतर अनेक प्रांतांमध्ये बौध्द धम्म विक्षेची लाट आल्यामुळे आज भारतात बौध्दांची संख्या कित्येक कोटींनी वाढलेली आहे. यामुळे बुध्दगया महाबोधी महाविहार मुक्तिसाठी देशभर शांती मार्च काढले जात आहे. भन्ते महाथेरो ज्ञानज्योती, डॉ. चेत्ती भन्तेजी आणि भिक्कू संघ, संघरामगिरी पुज्य भदन्त धम्मासारथी आणि भिक्कू संघ, बुध्दीष्ठ सेमिनारी उंटखाना, नागपूर यांच्या नेतृत्वात बुध्दगया महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलन समन्वय समिती वरोरा च्या वतीने आज बुधवार दि.२ एप्रिल रोजी वरोरा येथे शांती मार्च आयोजन करण्यात आले होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला माल्या अर्पण करून दुपारी १२:३० वाजताच्या सुमारास सदर शांती मार्चला सुरुवात झाली. तहसिल कार्यालयाच्या प्रांगणात शांती मार्च पोहोचल्यानंतर त्याला सभेचे रूप देण्यात आले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गुलाब बागेसर यांनी केले. आनंद वानखेडे यांनी प्रास्ताविकातून शांती मार्च ची भूमिका मांडली. उपस्थितांचे आभार प्रितम सोनारकर यांनी मानले. या मार्चमध्ये उपस्थित बौद्ध बांधवांना संजय बोधे,
डॉ. चेती भन्ते संघारामगीरी गुजगव्हान,भन्ते धम्मसारथी नागपूर यांनी मार्गदर्शन केले. तहसीलदारांना निवेदन देऊन मार्च ची सांगता झाली.या मार्चमध्ये वरोरा शहर व ग्रामीण भागातील बौद्ध बांधवांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला होता.
0 comments:
Post a Comment