सादिक थैम वरोरा:शेतकऱ्यांना पीक कर्ज मिळविताना येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी शिवसेनेच्या वतीने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदन देण्यात आले. ज्येष्ठ शिवसैनिक सुधाकर मिलमिले यांनी शिवसेना लोकसभा संघटक मुकेश जिवतोडे यांच्या मार्गदर्शनात मुंबई येथे सदर निवेदन सादर केले.
Farmers should be allowed to use ₹100 stamp paper for affidavit; Representation given to Deputy Chief Minister Eknath Shinde
राज्य शासनाच्या योजनेनुसार शेतकऱ्यांना दरवर्षी शेतीसाठी शून्य टक्के व्याजदराने पीक कर्ज पुरवले जाते. परंतु अलीकडेच लागू करण्यात आलेल्या नव्या शासन निर्णयानुसार सामूहिक शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना शपथपत्र सादर करताना ₹५०० च्या स्टॅम्पपेपरचा वापर बंधनकारक करण्यात आला आहे. या निर्णयामुळे लघु व अल्पभूधारक शेतकऱ्यांवर अतिरिक्त आर्थिक बोजा पडत असून अनेक शेतकरी कर्जासाठी अर्ज करण्यास टाळाटाळ करत आहेत.
या पार्श्वभूमीवर निवेदनात शासनाने सदर निर्णयात सुधारणा करून पूर्वीप्रमाणे ₹१०० च्या स्टॅम्पपेपरवर शपथपत्र सादर करण्याची मुभा देण्याची मागणी करण्यात आली आहे. यामुळे शेतकऱ्यांना पीक कर्ज प्रक्रियेत सुलभता मिळेल आणि आर्थिक भार कमी होईल, असा निवेदनाचा मुख्य हेतू आहे.
शेतकरीहिताच्या दृष्टीने या निर्णयावर पुनर्विचार करून शासनाने तत्काळ सकारात्मक भूमिका घेण्याची मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.
0 comments:
Post a Comment