Ads

वाघाच्या हल्ल्यात दोन गुराखी जागीच ठार

मुल :-चंद्रपूर जिल्ह्यात मानव-वन्यजीव संघर्ष शिगेला पोहोचला असून वाघाने तीन दिवसात तीन जणांचा बळी घेतला आहे.Human-Wildlife Conflict
आज मूल तालुक्यातील चिंचाळा येथे वाघाच्या हल्ल्यात दोन गुराखी जागीच ठार झाल्याची घटना १९ सप्टेंबर बुधवार दुपारच्या सुमारास घडली. नानाजी निकेसर ५३, ढिवरू वासेकर ५५ असे मृत गुराख्याचे नाव आहे. मागील तीन दिवसात तीन गुराख्यांचा मृत्यू झाला असून एक शेतकरी गंभीर जखमी झाला आहे.Two cowherds were killed on the spot in a tiger attack
चिंचाळा येथील गुराखी नानाजी व ढिवरू हे गुरे चारण्यासाठी चिंचाळा परिसरातील जंगलात गेले होते. जंगलात दबा धरून बसलेल्या वाघाने अचानक नानाजी यांच्यावर हल्ला चढवला. यावेळी नानाजीने आरडा-ओरड केल्याने ढिवरू वासेकर हा मदतीसाठी गेला. वाघाने त्यांच्यावरही हल्ला करून त्यांना जागीच ठार केले. घटनेची माहिती मिळताच गावकरी व वनविभागाचे अधिकारी, कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले आहे. पंचनामा केल्यानंतर उत्तरीय तपासणीसाठी मृतदेह पाठवण्यात आला आहे. वारंवार होणाऱ्या वाघाच्या हल्ल्यामुळे चंद्रपूर जिल्ह्यातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण
झाले आहे.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment