जावेद शेख प्रतिनिधी भद्रावती:-
तालुक्यातील चंदनखेडा येथील शासकीय आश्रम शाळेत जाणारा बसस्थानक ते आश्रम शाळा असा दोन किलोमीटर चा रस्ता खड्डे तथा चिखल्याने अत्यंत खराब झालेला असल्याने आश्रम शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांना व इतर नागरिकांना फार त्रास सहन करावा लागत आहे.
Repair the road leading to the government ashram school.
हा रस्ता दुरुस्त करण्याचा ठराव चंदनखेडा ग्रामपंचायत तर्फे पारित करण्यात आला आहे. या रस्त्याची त्वरित दुरुस्ती करून तो ये-जा करण्यासाठी योग्य करावा अशी मागणी चंदनखेडा ग्रामपंचायत तर्फे सरपंच नयन जांभुळे यांनी चंद्रपूर जिल्ह्याचेपालकमंत्री अशोक उईके यांना चंद्रपूर वन अकादमी येथेसादर करण्यात आलेल्या निवेदनातून करण्यात आली आहे.या दोन किलोमीटर रस्त्याची जागोजागी गिट्टी उखडून खड्डे पडलेले आहेत व पावसाळ्याचे दिवस असल्याने रस्त्यावर सर्वत्र चिखल पसरलेला असल्याने या रस्त्यावरून येणे जाणे कठीण झाले असल्याचे निवेदनातून म्हटले आहे. निवेदन सादर करताना सामाजिक कार्यकर्ते विकास धांडेउपस्थित होते.
0 comments:
Post a Comment